
मुंबई: छगन भुजबळ यांना जामीन भाजपच्या राजकारणामुळेच उशीरा मिळाला, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात बदल झाल्यानंतर भुजबळांना जामीन द्यायला परवानगी दिली होती. पण भाजपचे सरकार न्यायालयाने सांगूनही चालढकल करत राहिले. ही गोष्ट चुकीची असून भाजपने स्वत:च्या फायद्यासाठी आता भुजबळांना बाहेर काढले असेल तर ते लोकांना कळेलच. अशाप्रकारचे राजकारण योग्य नाही. मात्र, भाजपलाही एक्सपायरी डेट आहे, हे ध्यानात असू द्या, असे राज यांनी म्हटले.